पंचामृत अभिषेक पूजा

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अत्यंत आध्यात्मिक आणि उदात्त अशा पूजाविधींपैकी एक असा म्हणजे पंचामृत अभिषेक होय. दूध, दही, मध, तूप आणि साखर या पाच पवित्र पदार्थांच्या मिश्रणाला पंचामृत असे संबोधले जाते. या अभिषेकात पंचामृताचा समावेश केला जातो.

"पंचामृत" हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे, जिथे:

  • "पंच" याचा अर्थ पाच,
  • "अमृत" याचा अर्थ अमरत्व देणारे अमृत किंवा दिव्य अमृत.

म्हणून, पंचामृत याचा अर्थ "पाच पवित्र अमृतांचा मिश्रण" असा होतो. हिंदू धार्मिक विधींमध्ये, विशेषतः भगवान शिवाच्या अभिषेका दरम्यान पंचामृत शिवलिंगाला अर्पण केले जाते.
या प्रत्येक घटकाला (अमृत) एक विशिष्ट धार्मिक महत्व आहे. त्यात एकअद्भुत ऊर्जा असते; जी शुद्धता, पोषण आणि भक्ती यांचे प्रतीक असलेली एक दिव्य ऊर्जा निर्माण करते.

पंचामृत म्हणजे काय?

देवतांचे अमृत पंचामृत अभिषेक पूजेमध्ये अर्पण केले जाणारे पाच घटक हे आध्यात्मिकतेचे प्रतीक आहेत, जसे :-

  • दूध (Milk) –दूध (Milk) –
  • दही (Curd) –सामर्थ्य आणि समृद्धीचे प्रतीक
  • मध (Honey) –एकता आणि जीवनातील गोडवा दर्शवतो.
  • तूप (Ghee) –विजय आणि दैवी ऊर्जेचे प्रतीक
  • साखर (Sugar) – आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते.
  • हे सर्व घटक एकत्र येऊन एक पवित्र अमृत तयार होते, जे महादेवाला प्रसन्न करते आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुभाशीर्वाद आणते.

पंचामृत अभिषेक घृष्णेश्वर मंदिरात का करावा?

घृष्णेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील प्राचीन वेरूळ लेण्यांच्या जवळ वसलेले घृष्णेश्वर मंदिर हे एक दैवी ऊर्जा असलेले मंदिर आहे.
पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने, या ठिकाणी एक अद्वितीय आध्यात्मिक चैतन्य आहे. जिथे भगवान शिव आपल्या सर्वाधिक करुणामय आणि दिव्य स्वरूपात प्रकट होतात, असे मानले जाते. जेव्हा आपण येथे महादेवाला पंचामृत अभिषेक पूजा करतो, तेव्हा आपण पाच पवित्र अमृतांचे मिश्रण अर्पण करण्याबरोबर स्वतःला अध्यात्मिक प्रगतीकडे झोकून देतो.

घृष्णेश्वर मंदिरात पंचामृत अभिषेक करण्यासाठी सर्वोत्तम पंडितजी / गुरुजी:

गृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे सर्व पूजा अधिकृत ताम्रपत्रधारी पंडितजींद्वारेच केल्या जातात— पिढ्यानपिढ्या पासून ह्या सर्व गुरुजींना इथे पूजा अभिषेक करण्याचे हक्क आहेत. तसेच वैध ओळखपत्रां बरोबरच त्यांना पूजा करण्याकरिता मंदिराद्वारे अधिकृतपणे मान्यता प्राप्त आहे. खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आणि प्रामाणिक पूजा अनुभवण्यासाठी, फक्त ब्रह्मवृंद संघाच्या अधिकृत पुरोहितांशीच संपर्क साधा. तुमच्या पूजाची पुष्टी करण्यासाठी खालील गुरुजींच्या प्रोफाइलशी संपर्क साधा.
(Coming soon)

चला पंचामृत अभिषेकाबाबत अधिक तपशीलात जाणून घेऊया:

1. भूतकाळातील कर्मे आणि नकारात्मक उर्जांचे शुद्धीकरण करते.

अभिषेकादरम्यान पंचामृताचा शिवलिंगावरील प्रवाह हा दृष्य आणि अदृष्य अशा सर्व अशुद्धतांचा नाश करतो. प्रत्येक थेंबासोबत, आपण आपल्या भूतकाळातील चुकांचे/ पश्चातापाचे पापक्षालन आणि कर्मिक ऋणाचे समर्पण भगवान शिवाच्या चरणांवर करतो. गुरुजींद्वारे उच्चारिलेले शक्तिशाली मंत्र हे व्यक्तीचे शुद्धीकरण भाव आणखी द्विगुणित करतात, ज्यामुळे आपल्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त होते आणि मन संतुलित होते. "जसे वाहणारे पाणी दगडाला शुद्ध करते, तसचं पवित्र विधी आत्म्याला शुद्ध करतात."

2. चांगले आरोग्य, शांती आणि समृद्धी आणते.

पंचामृतातील प्रत्येक घटक—दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्वतःचे आध्यात्मिक आणि वैदिक गुण आहेत. हे सर्व एकत्र येऊन फक्त शिवलिंगाचे पोषणच करत नाहीत, तर भक्ताला आशिर्वादही प्राप्त करून देतात. या पूजेने खालील गोष्टींची प्राप्ती होते असे मानले जाते:

  • दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून दिलासा.
  • मानसिक तणाव आणि चिंता दूर होणे.
  • समृद्धी, स्थिरता आणि आंतरिक शांती यांची वृद्धी होणे .
  • महादेवाच्या आराधनेत स्वतःला लिन करून घेतल्यास अध्यात्मिक प्रगती होते व मनःशांती लाभते. त्यामुळे आपणास जीवन सुखकर वाटते.

3. मनोकामनांची पूर्ती होते आणि जीवनातील अडथळे दूर करते.

आपण करियरच्या आव्हानांचा, कौटुंबिक समस्या किंवा नातेसंबंधातील अडथळ्यांचा सामना करत असाल, तर पंचामृत अभिषेक एक आध्यात्मिक पुनर्स्थापनेचे कार्य करते. भक्तीचा हा मार्ग, तीव्र इच्छाशक्ती आणि पवित्र लहरींना एकत्रित करून, अडथळ्यांना दूर सारतो आणि नवीन सुरवात करण्यासाठी मदत करतो. या पवित्र ठिकाणी ज्योतिर्लिग स्थानी हि पूजा यथासांग संकल्पासहीत केल्यास शंकराचे थेट आशीर्वाद प्राप्त होतात व आपल्या मनोकामना पूर्णत्वास येण्यास, आश्चर्यचकित करणारे बदल घडण्यास आणि सकारात्मकतेची प्राप्ती होण्यास मदत होते.

4. दैवी कृपा, संरक्षण आणि आध्यात्मिक जागृती वृद्धिंगत करते.

भगवान शंकर हे अज्ञान आणि अहंकाराचे संहारक आहेत, तसेच वैश्विक सत्य आणि आंतरिक आनंदाचे दाता आहेत. पंचामृत अभिषेक ही फक्त एक अर्पण पूजा नसून तो एक आध्यात्मिक संवाद आहे. जेव्हा आपण श्रद्धेने शिवलिंगावर अमृत अर्पण करता, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या आतली दिव्य चेतना जागृत करत असता.

ही पूजा एक मार्गदर्शक बांध आहे ज्याद्वारे आपल्याला खालील गोष्टींची प्राप्तता होते:

  • नकारात्मक शक्तींपासून संरक्षण
  • आपल्या आत्म्याशी आणि उद्दिष्टाशी एक सखोल नाते निर्माण करते.
  • अत्यंत फायदेशीर उपयुक्त ठरते :-
    उपचार घेत असलेले, मानसिक शांती, किंवा भावनिक संतुलन शोधत असलेल्या व्यक्तींसाठी
  • जे भक्त कौटुंबिक सौदार्ह्य, समृद्धी, किंवा वैवाहिक जीवन सुधारू इच्छित आहेत.
  • आध्यात्मिकतेकडे वाटचाल करणारे भाविक जे भगवान शंकराशी खोलवर नाते प्रस्थापित करण्याची इच्छा बाळगतात.

ग्रिशनेश्वर मंदिरातच का?

महाराष्ट्रातील वेरूळ (एलोरा) लेण्यांच्या जवळ वसलेल्या ग्रिशनेश्वर / घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या स्थानी ही पूजा केल्याने तिचे आध्यात्मिक प्रभुत्त्व वाढते. असे मानले जाते की शंकर स्वतः येथे त्यांच्या अत्यंत कृपाशील आणि दयाळू रूपात वास्तव्य करतात, ज्यामुळे पंचामृत अभिषेकाद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा एक परिपूर्ण ठिकाण आहे.

गृशनेश्वर/ घृष्णेश्वर येथील पंचामृत अभिषेक पूजेची दक्षिणा :

पुजेचा/दक्षिणेचा खर्च पंडितजींनुसार वेगळा असतो. दक्षिणेची पुष्टी करण्यासाठी, आपण वरील प्रोफाइलमधील कोणत्याही अधिकृत पंडितजींना संपर्क करू शकता.

पंचामृत अभिषेक पूजेसाठी सर्वोत्तम दिवस:

  • सोमवार (शंकराचा दिवस)
  • श्रावण महिना
  • प्रदोष व्रत
  • महाशिवरात्रि

सारांश…

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे पंचामृत अभिषेक करणे हा केवळ एक विधी नाही—तो एक पवित्र अनुभव आहे; जो उपासना , समृद्धी आणि ज्ञानाच्या दिशेने मार्ग दाखवतो. ह्या ठिकाणी श्रद्धा आणि परिवर्तन यांचा मेळ होतो, आणि जिथे आपली प्रार्थना थेट भगवान शिवाच्या हृदयापर्यंत पोहोचली जाते. फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर आपल्या अंतर्मनातील दिव्य जागृत करण्यासाठी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे अवश्य भेट द्या

© 2024, Privacy Policy And Terms & Conditioons All rights reserved.